Wednesday, February 11, 2009

भाजपची गोची


डिसेंबर-1980

स्थळ-मुंबई
जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता आपली नवीन राजकीय वाटचाल ठरवण्याकरता पूर्वीच्या जनसंघातले नेते एकत्र आले होते.आपल्या पक्षाला एक वेगळी वैचारिक बैठक आहे.त्यामुळे एक नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलं.भाजपचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या ओजस्वी भाषणात मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फूंकलं..या भाषणात अटलजी म्हणाले होते

'' अंधेरा हटेगा,सुरज निकलेगा और कमल खिलेगा ''
आज या घटनेला 29 वर्ष झाली आहेत. 2 खासदरांपासून सूरु झालेल्या पक्षाचा ग्राफ 183 वर जाऊन पोचला.नंतर 2004 च्या निवडणुकीत तो 134 वर घसरला.मात्र या तीन दशकातल्या देशाच्या जडणघडणीमध्ये भाजपचा वाटा मोठा आहे.हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावं लागेल.खर तर हिंदुत्व विचाराच्या राजकीय क्षेत्रातल्या प्रसाराकरता जनसंघाची स्थापना 1950 च्या दशकात करण्यात आली.भाजप हे त्याचे नंतरचे रुप.भाजपच्या या वाटचालीचे तीन टप्यात विभागणी करावी लागेल.
1980 ते 1990 हा पहिला टप्पा. भाजपच्या स्थापनेचं हे दशक. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानभूतीच्या लाटेत भाजपची संपूर्ण वाताहत झाली.अगदी अटलजी आणी अडवानीसह सारे दिग्गज नेते पराभूत झाले.एक पक्ष म्हणून खर तर हा सर्वात खडतर काळ होता.एखादा कच्च्या विचारसरणीचा पक्ष असता तर हा संपूर्ण उद्धवस्त झाला असता.परंतू भाजपचं नेतृत्व नक्कीच तसं नव्हतं.अडवाणी अटलजींच्या या टिमनं 1989 च्या निवडणुकीत भाजपला 80 च्या पूढं पोचवलं.
ह्यानंतरचा काळ हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असावा असंच मला वाटतं. कॉँग्रेसचा 1989 च्या निवडणिकीत मोठा पराभव झाला. डावे,उजवे आणि समाजवादी पक्षाच्या युतीनं (जनता पक्षाची 12 वर्षानंतरची नवीन आवृत्ती ) व्ही.पी.सिंग सरकार सत्तेवर आलं.व्ही.पी सिंग यांच्या मंडल राजकारणाला उत्तर देण्याकरता भाजपनं कमंडल राजकारण सुरु केलं असा दावा नेहमी केला जातो.मात्र मला तसं वाटत नाही.भाजपची मूळ ज्या विचारधारेत आहेत त्या संघपरिवाराच्या विचारधारेचा अभ्यास केला तर राममंदीराचा मुद्दा भाजप मेन अजेंड्यावर घेणार हे कळून येत.सांस्कृतीक राष्ट्रवाद हाच या विचारधारेचा गाभा आहे.मात्र या राष्ट्रवादाचा राजकीय फायदा साधून घेण्याचं टायमिंग अडवानी-प्रमोद महाजन यांच्या टिमनं बरोबर साधलं.रामनामाची चादर ओढून 6 डिसेंबरला आयोध्येत लाखो कारसेवक पोहचले.या कारसेवांनी बाबरी मशीद पाडली.ही मशीद पडली आणी भाजपच्या समोरचा एक मोठा विषय एका क्षणात संपला.
जी बाबरी मशीद दाखवून अनेक निवडणुका जिंकता आल्या असत्या.लाखो भोळ्या-भाबड्या हिंदु मतदारांचे मतं जिंकता आली असती ती मशीदचं पडली. या घटनेनंतर इतर राजकीय पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली.शिवसेना,अकाली दल यासारखे काही मोजके पक्ष सोडले तर भाजपला जवळ करण्यास कोणीच तयार नव्हतं. याच कारणामुळे 1996 साली अचलजींना अवघ्या 13 दिवसात सत्ता सोडावी लागली. 1996 च्या या घटनेनंतर मात्र भाजपनं आरलं धोरण पूर्णपणे बदललं असंच म्हणावं लागेल.
निवडणुक जिंकण्याची शक्यता हाच एकमेव 'राम' मंत्र भाजपनं स्वीकारला.काश्मीर साठी वेगळी घटना मागणा-या नॅशनल कॉन्फरन्स पासून ते प्रभू रामचंद्राचे कट्टर वैरी करुणानिधीपर्यंत सर्वांनाच भाजपनं पावन करुन घेतलं.पार्टी विथ डिफरन्स या पक्षाच्या प्रतिमेला इतके तडे गेली की आता ही खरचं या पक्षाची प्रतिमा आहे का असा प्रश्न आता पडतोय.एकवेळ अशी होती की भाजपचे कट्टर विरोधकही असं म्हणंत ही माणसं चांगली सदप्रवृत्त आहेत.आता भाजपचे समर्थकही खाजगीत मान्य करतात आमचे अनेक नेते भ्रष्ट आहेत.संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचार केला.संरक्षण सारख्या सर्वात संवेदनशील क्षेत्रातल्या प्रकरणात लाच घेताना भाजप अध्यक्ष पकडले गेले.संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणरे सर्वात जास्त खासदार भाजपचे होते.माणूस स्खलशील आहे.कितीही संस्कार केले तरी लोभ संपत नाहीत...हे कटू वास्तव भाजपच्या बाबतीत ही खरं आहे असंच म्हणावं लागेल.शुद्ध चारित्र्या प्रमाणे स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी 'इतपतच भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्या कीच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.
खर तरं एक केडर बेस असा पक्ष अशी भाजपची ओळख आहे. पक्षाच्या वाढीकरता आपल्या संपूर्ण आयुष्याचा कण कण झिजवणारे अटलजी,कुशाभाऊ ठाकरे,सुंदरसिंग भंजारी,रामभाऊ म्हाळगी या सारख्या हजारो निस्वार्थ शुद्ध चारित्र्यांच्या रक्ताच्या सिंचणातून ह्या पक्षाला आज हा पक्ष सा-या देशात फोफावलाय.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हेही एक कडव्या पक्ष शिस्त पाळणारे, पक्षाला नेहमी वेगळी दिशा देणारे एक चिंतनशील नेते म्हणून ओळखले जातात.भाजप आणि एनडीए सरकारनी जी अनेक महत्वाचे निर्णय घेतले या निर्णयामागचा खरा ब्रेन अडवानींचा होता.हे त्यांचा अगदी कट्टर विरोधकही मान्य करेल.टिपीकील राजकीय प्रवृत्ती नसलेल्या व्यक्तींचा पक्ष अशी भाजपची सुरवातीची ओळख होती.मात्र तीच ओळख आता पुसट होत चाललीय.कॉँग्रेसची दूसरी बाजू म्हणजे भाजप ही आता नवीन ओळख ब-याच क्षेत्रात निर्माण होऊ लागलीय.ही ओळखचं अस्वस्थ करणारी आहे.
माझे सर आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी मागे एकदा या विषयावर चर्चा करत असताना त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती.तीच गोष्ट हा ब्लॉग लिहताना मला पून्हा पून्हा आठवतीय. एक आस्तित आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.
राष्ट्रीय राजकारणात एक विचार म्हणून एक संघटना म्हणून भाजपची जी गोची झालीय..ती गोची ही गोष्टीतल्या या आस्तिक माणसासारखीच आहे असंच मला सतत वाटतं.

6 comments:

Niranjan Welankar said...

Chhan lekh. Vishleshan balanced ahe.

anilpaulkar said...

yes, bjp sadhya sambhramat aahe, partiche mukhya nete (Vajpayee)niwrrat zale aahet, adwanina barech jan neta manat nahit, & Pramod Mahajan yancha nantar kuni dusrya falichi jababdari par padu shakle nahi...mag gochi honar nahi tar kai honar.
jya Ram nawane partila tarle hote, te Ramache Nav sodun dilyanantar parti budnarch na...ha tar Ramayna itihas aahe...

Devidas Deshpande said...

Good article, Onkar. Liked it.

krishnat said...

भाजपच्या सद्यस्थितीचा आणि मागील कारकिर्दीचा सांगोपांग आढावा या लेखात घेण्यात आलाय. ब-याच दिवसानंतर इतका चांगला लेख वाचला.

संतोष गोरे, मुंबई.

Unknown said...

bjp ha nehmich confused asa pakshy watato.tyala nakki satta hawi(tas saglya pakshyanch haway)pan nusata ram mandiracha mudda gheun niwadanuk kiti diwas ladhnar aahet?kahi vidhayak kam karun lokancha wishawas jinakan lambch aahe.

mazya mata prmane nusat bakinchya pakshynchya nawane ordanya peksha kam karun dakhwaw.magch niwadanukit ubhe rahawe

Priyanka Deshpande said...

Omkar nice efforts...... but don't you think that BJP couldn't get the power at its own thats why it omitted some of its commitments to the nation????

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...